भारतीय रेस्टॉरंट खाद्यसंस्कृतीत अग्रगण्य म्हणजे पंजाबी क्विझिन , व्यक्ती कोणत्याही भागातून असली तरी रेस्टॉरंट मध्ये पंजाबी छोले भटुरे किंवा मटर पनीर किंवा बटर चिकन यातले एखादे ऑर्डर मध्ये असतेच असते !
…
Celebrating Passion for Food
भारतीय रेस्टॉरंट खाद्यसंस्कृतीत अग्रगण्य म्हणजे पंजाबी क्विझिन , व्यक्ती कोणत्याही भागातून असली तरी रेस्टॉरंट मध्ये पंजाबी छोले भटुरे किंवा मटर पनीर किंवा बटर चिकन यातले एखादे ऑर्डर मध्ये असतेच असते !
…
दिवाळी म्हणजे दिव्यांची रोषणाई , फटाक्यांची आतषबाजी , सुंदर नवीन वस्त्रालंकार आणि राहिलेच की फराळाचा घमघमाट ! दिवाळीत घर उजळून टाकायची जबाबदारी तसे प्रत्येकजण आपापल्या परीने करीत असतोच , परंतु फराळ बनवणे हे जोखमीचे काम ….
…
” You can’t make everyone happy , you are not Aloo Ka Parantha !” सकाळी सकाळी व्हाट्सअँप वर आलेल्या या फॉरवर्ड मुळे जाम हसले मी ! माहित नाही कोणाच्या सुपीक डोक्यातून हा भन्नाट विनोद आलाय , परंतु जे लिहिलेय ते एक वैश्विक सत्य ( युनिव्हर्सल ट्रूथ ) आहे !
…
मागे काही वर्षांपूर्वी कुटुंबासमवेत पाचगणी महाबळेश्वरला चाललो होतो . मी तेव्हा इन्फोसिस मध्ये नोकरीला होते आणि शिफ्टच्या जॉबमुळे कंपनीच्या कॅब ने येणे जाणे असायचे . असंच आमचे एक मावळचे कॅब वाले शिवाजी दादा आहेत , त्यांचीच कॅब प्रायव्हेटली बुक करून आम्ही पाचगणी महाबळेश्वर प्लॅन केले .
…
उद्या दसरा , विजयादशमी – साडेतीन मुहूर्तांपैकी एक! दसऱ्याचे सीमोल्लंघन ,,, ते ” दसरा सण मोठा , नाहीsssss आनंदा तोटा …” असे गात घरोघरी सोने वाटत फिरणे , पाटीवर काढलेली सरस्वती , तिचे पूजन , लाल कापडावर चौरंगावर नीट मांडून , हळद पिंजर लावलेली घरातील आयुधे , टीवी फ्रिज ओव्हन हे आधुनिक स्वयंपाकघरातील शिलेदार सुद्धा झेंडू , आंब्याच्या पानाच्या माळा धारण करतील… गोंड्याच्या फुलांचे आणि आपट्याच्या पानांचा घरात रचलेला ढीग , सारे वातावरण उद्या भारलेले असेल .
…
काही दिवसांपूर्वी फेसबुक वर एक पोस्ट वाचनात आली आणि बऱ्यापैकी ती सोशल मीडियावर चांगलीच फिरली . एका मानसोपचार तज्ज्ञांनी त्या पोस्ट मध्ये आपल्या सणासुदीचे आयुष्यातील महत्त्व अगदी पटेल अशा सोप्या भाषेत सांगितले होते . आपण जे सण साजरे करतो ते एक रिलॅक्सेशन असून नैराश्याला दूर ठेवण्याचा एक उत्तम मार्ग आहे . सध्या आपल्याला वेळ नाही किंवा कोणी “सनातनी विचारांचे” म्हणून टॅग लावला जाईल की काय या भीतीने आपण सण साजरे करायचे सोडून आलेय . लेखकाच्या मते आणि त्यांच्या या भूमिकेशी मी पूर्ण सहमत आहे , जर सणांमागचे भाव , ते का साजरे होतात याचे उद्देश जाणून घेतले तर ते एक अवडंबर न होता स्ट्रेस बस्टर म्हणून चांगले काम करतात .
…
माणसाचे शरीर हे त्रिदोष युक्त म्हणजे कफ , वात आणि पित्त तसेच पंचेंद्रियांनी भारलेले आहे . या त्रिदोषांविषयी जाणून घेतले आणि आपल्या पंचेंद्रियांवर थोडा अंकुश ठेवला तर एक आरोग्यदायी जीवनाची किल्लीच आपल्याला गवसेल .परंतु सहसा असे होत नाही आणि आपण आपल्या ज्या गोष्टी खायची इच्छा होते त्यांचे पोषण मूल्ये जाणून न घेता त्यांवर ताव मारतोच!
…
भारत देशाला एका वाक्यात जर अनुभवायचे असेल तर मी तर म्हणेन ” A Rich Land of Festivals ” – सणांचा अतुलनीय वारसा लाभलेला भिन्न प्रकारच्या संस्कृतीने नटलेला देश आपुला ! उगाचच नाही , आपली दिनदर्शिका , मग ती कालनिर्णय असो कि महालक्ष्मी , लाल रंगानी महिन्यातलया कितीतरी तारखा रंगल्या असतात !
…
कल्पनाशक्ती ही ज्ञानापेक्षा महत्त्वाची असते , तिचे पंख लावून मन कुठल्याही गगनात उंच भराऱ्या मारू शकते ! असे वाचलेले कुठेसे आठवत आहे मला , आणि ते बऱ्याच अंशी खरही आहे . मनोविज्ञान म्हणते दिवस भराच्या थकव्यानंतर जर तुम्ही शांत डोळे मिटून आपल्या आवडीच्या खाद्य पदार्थ आणि त्यांसोबत जुळलेल्या आठवणी जागवल्यात तर तुमचे मन एका पॉसिटीव्ह एनर्जी ने उत्साहित होते आणि तुमचा थकवा दूर पळून जातो !
…
कोणत्याही जागतिक संकटापेक्षा एका गृहिणीला भेडसावणारा प्रश्न म्हणजे ” रोज नाश्त्याला काय बनवायचे ” आणि त्यातून जर घरात लहान मुले , म्हातारी माणसे , आणि कोणी रोज आरोग्यमंदिर म्हणजेच जिम जाणारे असतील तर काही विचारायलाच नको ! प्रयेकाच्या चवीला आणि तब्येतीला पटतील असे पदार्थ बनवणे म्हणजे तारेवरची कसरतच !
…