आज देवाची पूजा करताना , मनात नेहमीचा उत्साह नव्हता . अगदी यांत्रिकपणे पोकळी निर्माण झाल्यासारखे पूजा करायचे कार्य केले . दिवा लावताना मात्र माझ्या देवघरात बसलेल्या त्या करवीरनिवासिनी अंबाबाईच्या टपोऱ्या डोळ्यांत पाहतांना मनात दाटून आलेले आभाळ डोळ्यांतून टपटप वाहू लागले , काय झाले मला .. दिव्याची वात धूसर दिसू लागली , कसबसं २ काड्या जाळून एकदाचा वातीने पेट घेतला ! आज हात जोडायचे , स्तोत्र म्हणायचे काही सुद्धा केले नाही , फक्त कितीतरी वेळ स्तब्ध उभं राहून मनातली गाऱ्हाणी त्याच्यासमोर आळवत बसले होते .
…