भारतीय खानपान हे सध्या संक्रमणास्थित आहे ! हे म्हणताना माझ्या डोक्यात काही विचार घोळत आहेत , तेच तुमच्यापुढे मांडायचा हा प्रामाणिक प्रयत्न या ब्लॉग मधून ! चौरस आहार मिळावा म्हणून पौष्टिक खाण्याचे पर्याय शोधण्याच्या नादात आपण पार ग्लोबल खाद्यसंस्कृती रोजच्या जेवणात आत्मसात करण्यासाठी धडपडत आहोत . त्यात वाईट काहीच नाही , परंतु या प्रयत्नांत आपण आपल्या अवतीभवती ताजे पिकणाऱ्या लोकल इन्ग्रेडिएंट्सना अजाणतेपणी दुर्लक्ष करीत आहोत , म्हणजे ” काखेत कळसा नी गावाला वळसा ” अशातली गत होऊन राहिली ! ग्लोबल खाद्यसंस्कृतीच्या झगमगाटात आपल्या आज्या – पणज्यांचे पदार्थ जरासे बुजरे झालेत . म्हणूनच काळाच्या ओघात प्रवाहासोबत वाहताना नव्या सोबत जुनी अनुभवी वल्ह्णवं सुद्धा हाती राहू द्यावी इतकेच माझे म्हणणे !
…