स्थळ: कोकणातील गजालवाडी हे पंचवीसेक उंबऱ्यांचे कौलारू टुमदार गाव
दिवस: भाद्रपद गणेश चतुर्थी
वेळ : वाडीत घरोघरी लोकांच्या गणपतींची आरती उरकून रात्री भजनी मंडळ आपापल्या घरी परतताना …
…
Celebrating Passion for Food
स्थळ: कोकणातील गजालवाडी हे पंचवीसेक उंबऱ्यांचे कौलारू टुमदार गाव
दिवस: भाद्रपद गणेश चतुर्थी
वेळ : वाडीत घरोघरी लोकांच्या गणपतींची आरती उरकून रात्री भजनी मंडळ आपापल्या घरी परतताना …
…
कुतूहल , आश्चर्य , जिज्ञासा , कौतुकमिश्रित हेवा ह्या अशा भावना मनुष्याच्या ठायी असणे , हा अवघ्या मानवजातीचा स्थायीभाव ! अर्थात मीही याला अपवाद नाही . यातून जो तरला तो खरा मोक्षार्थी ! नाही हो , आज अचानक सणाच्या दिवसांत माझ्यातील अध्यात्मिक ज्योत जागली , असे वगैरे काही नाही . उलट दहा दिवस बाप्पासोबत , किंबहुना बाप्पाच्या निमित्ताने खादाडी करून , आम्ही सुद्धा जिव्हेवरचे सगळे रस तुषार उडवून घेणार आहोतच !
…
मनुष्याचे जीवन सुखकर करण्याचे काम करतात – विरंगुळ्याची साधने ! वाचन , नृत्य, नाट्य, चित्रकला , खाणे, पिणे अशा निरनिराळ्या विरंगुळ्यासोबत “झोपणे ” हा विरंगुळा असू शकतो का ? अहो , द्या टाळी , असतोच मुळी ! उदाहरण पाहायचे असेल तर माझ्याकडेच बघा .. शांत झोप घेणे , अगदी ” sleep like a baby ” , ही उक्ती मी तंतोतंत खरी ठरवली आहे . हा आनुवंशिक गुण बाबाकडून माझ्यात चांगलाच उतरलाय .
…
हाडाच्या मत्स्यगोत्रींना तळलेले मासे म्हणजे स्वर्गानुभवच ! त्यातून सुरमई , पापलेट , रावस असा समुद्राचा फडफडीत चंदेरी खजिना जेव्हा कोळणींच्या टोपल्यांत सजतो तेव्हा ठरलेलं नसताना सुद्धा बाजारच्या पिशवीतून एखादी लांबुडकी सुरमईची शेपटी बाहेर डोकावत हळूच स्वयंपाकघरात ओट्यावर विसावते .
…
या जगात कुठे विरोधाभासांत आनंद निर्माण होतो , हे पहायचे असेल तर ती दुनिया आहे मुंबईत .. ही स्वप्ननगरी , इथे भले भले हिंमत बाळगून , अतिशय कष्ट करून आपल्या लहानमोठ्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी धडपडत .. आणि गंमत पहा , स्वप्न पाहायला डोळे मिटून एक शांत झोप तरी असावी , तर तसे नाही हं ! ” Mumbai – a city that never sleeps” म्हणून या शहराचा गाजावाजा ! आहे की नाही अजब विरोधाभास ! म्हणूनच मी सुरुवातीला म्हटले की , मुंबई म्हणजे चकित करणाऱ्या सुंदर विरोधाभासांची दुनिया – तुमची ,आमची ,सगळ्यांची – स्वप्नांची दुनिया !
…
भारतीय खाद्यसंस्कृतीत कोकणी खाद्यसंस्कृती आपले एक ठळक वैशिष्ट्य लेऊन नांदते . कोकणात निसर्गात आढळणाऱ्या ताज्या , साध्या आणि मोजक्याच घटक पदार्थांचा वापर करून एक चविष्ट अशी पंगत कशी बसवावी , हे कोकणी घरांतल्या प्रत्येक अन्नपूर्णेला चांगलेच ठाऊक ! फणसासारख्या एकाच फळापासून , त्याच्या निरनिराळ्या जातीचा वापर करून अवचित आलेल्या पाहुण्याला तांदळाच्या मऊसूत भाकरीसोबत कोवळ्या कुयरीची भाजी , कुरण्या फणसाची चमचमीत कापे नी बरक्याच्या गऱ्यांचा रस चाळून कधी मोदकपात्रात उकडलेली सांदणे पानात पटदिशी वाढली जातील . हापूसचीही तीच गत .. अगदी पुरी बुचकळायला जायफळ घातलेल्या आमरसापासून ते आंबाभातापर्यंत , रायवळच्या आंबट तिखट सासवाने , पानात रंगीबेरंगी मेजवानी सजेल . दारातल्या तवशा , पपई नी भोपळ्याचे वडे नी आंबेमोहोराची खीर असली की खाणाऱ्या आत्म्याची ब्रह्मानंदी टाळी लागायला काय हो अवकाश ! उसळी, सांबारांशिवाय तर लग्नाचे वर्हाड अंगणातून बूड हलवेल तर शप्पथ … “अन्न हे पूर्णब्रह्म ” , मानणारी ही कोकणी खाद्यसंस्कृती आणि तिच्यावर अतीव प्रेम करणारा कोकणी मनुष्य साध्या ताम्बसाळाच्या भाताच्या पेजेवर सुद्धा म्हणूनच समाधानाने दिवस व्यतीत करतो . माझे हे वरील विवरण बऱ्याच जणांना पटेल , कारण त्यात अतिशयोक्ती काहीच नाही .
…
भारतीय खानपान हे सध्या संक्रमणास्थित आहे ! हे म्हणताना माझ्या डोक्यात काही विचार घोळत आहेत , तेच तुमच्यापुढे मांडायचा हा प्रामाणिक प्रयत्न या ब्लॉग मधून ! चौरस आहार मिळावा म्हणून पौष्टिक खाण्याचे पर्याय शोधण्याच्या नादात आपण पार ग्लोबल खाद्यसंस्कृती रोजच्या जेवणात आत्मसात करण्यासाठी धडपडत आहोत . त्यात वाईट काहीच नाही , परंतु या प्रयत्नांत आपण आपल्या अवतीभवती ताजे पिकणाऱ्या लोकल इन्ग्रेडिएंट्सना अजाणतेपणी दुर्लक्ष करीत आहोत , म्हणजे ” काखेत कळसा नी गावाला वळसा ” अशातली गत होऊन राहिली ! ग्लोबल खाद्यसंस्कृतीच्या झगमगाटात आपल्या आज्या – पणज्यांचे पदार्थ जरासे बुजरे झालेत . म्हणूनच काळाच्या ओघात प्रवाहासोबत वाहताना नव्या सोबत जुनी अनुभवी वल्ह्णवं सुद्धा हाती राहू द्यावी इतकेच माझे म्हणणे !
…
” I built my comfort zone with Mom’s food!” -Kani
खरं आहे ना .. कंफर्ट फूड म्हटले की गूगल राव तोऱ्यात अगदी आपल्या तोंडावर व्याख्या फेकतात , ” जे पदार्थ खाताना जुन्या आठवणींना , पर्यायाने भावनांना उजाळा मिळतो असे पदार्थ !” माझ्या बाबतीत तर माझे पूर्ण खाद्यजीवन ही आठवणींची गुहा आहे , अलिबाबाच्या गुहेसारखी … जितकी खोलवर आत जाईन तितकी त्या द्रव्याने मन दिपवून टाकणारी ! माझ्या मुळात खादाड पिंडाला अजून लाडावून ठेवले गेले , ते माझ्या घरातल्या दोन बायकांनी – एक माझी माता , नी दुसरी मातेची माता – माझी आज्जी ! भले घरातलेच पदार्थ असो परंतु चवीच्या बाबतीत उच्च दर्जाचे . चाळीतल्या शेजाऱ्यापाजाऱ्यांनी गौरी-गणपतीत याचा अनुभव कित्येकदा घेतलाय .
…
“ Change is the only constant in life. Ones ability to adapt to those changes will determine your success in life !” – Benjamin Franklin
…
“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं! ”
आपल्या आईची माया, आजीचा ओलसर जिव्हाळा आणि आपल्या स्वतःच्या घरातील जेवणावरचे प्रेम सगळ्यांचं सारखं असतं.. चुकीचे बोलले काय सांगा? नोकरी करणाऱ्या पालकांचं अपत्य म्हणून पहिल्यापासून ‘ शहाण्यासारखं वाग हां बाळ ‘ असे म्हणून आई सकाळची ८.२३ ची लोकल पकडायला पळाली की घरात मी आणि आजी आम्हा, दोघींचेच राज्य..
…