“ Change is the only constant in life. Ones ability to adapt to those changes will determine your success in life !” – Benjamin Franklin
…
Celebrating Passion for Food
“ Change is the only constant in life. Ones ability to adapt to those changes will determine your success in life !” – Benjamin Franklin
…
One of the recurring grumbling that one would hear about Biryanis is that it is one of those dishes that requires great deal of patience and warrants an extensive list of ingredients and an elaborate preparation.
…
“प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं! ”
आपल्या आईची माया, आजीचा ओलसर जिव्हाळा आणि आपल्या स्वतःच्या घरातील जेवणावरचे प्रेम सगळ्यांचं सारखं असतं.. चुकीचे बोलले काय सांगा? नोकरी करणाऱ्या पालकांचं अपत्य म्हणून पहिल्यापासून ‘ शहाण्यासारखं वाग हां बाळ ‘ असे म्हणून आई सकाळची ८.२३ ची लोकल पकडायला पळाली की घरात मी आणि आजी आम्हा, दोघींचेच राज्य..
…
नुकतीच आंब्याची पाडणी होऊन , पाडव्याला पहिला आंबा ग्रामदेवतेच्या चरणी वाहून मामाने पेट्या बांधून मुंबई पुण्यास धाडल्या. पडवीत एका बाजूला पुढच्या खेपेच्या आढ्या बांधण्यासाठी हापूसचा खच पडलेला , त्याच्या अगदी समोरच्या भागात रायवळ , बिटक्याचे ढीग जिकडे आम्हा बच्चे पार्टीचा मुक्त संचार .. कोपऱ्यात माळ्याच्या जिन्याच्या आधाराने फणसांचे धूड .. बाहेरून घरात शिरणाऱ्याला कोकणमेव्याचा सुवास असा कॉकटेल च्या रूपात नाकात भसाभसा शिरायचा ! आम्हां मावस- मामे भावंडांचं वार्षिक परीक्षा आटपल्यावर दुसऱ्या दिवशीच रातराणीने मुरुडास आगमन झालेलं ! आंब्या – फणसाचा हा ढीग म्हणजे आमची चंगळ आणि त्यासोबत एकमेकांच्या अंगावर आंब्यांच्या चोखून चोथा केलेल्या कोयी नेम धरून मारणे , भाताच्या उंडवीत भसकन घुसणे , समुद्रावर पुळणीच्या डोंगरांत नखशिखांत माखून येणे , विहिरीवरच्या हौदात म्हशींसारखे तासंतास डुंबत राहणे , ह्या अशा खोड्यांनी दोनच दिवसांत घरातल्या आज्या -पणज्यांच्या , मामींच्या , मावशींच्या नाकात दम आणला जायचा ! घरी काम करणाऱ्या तान्या आजोबाला तर दुपारी-तिपारी कारटी कुठं उलथलीत ते हुडकून आणायची तसेच तिन्हीसांजेच्या आधी दम देऊन घरी बसवण्याची एक वेगळीच एक्सट्रा ड्युटी लागलेली !
…
” निसर्गाची करणी नी नारळात पाणी …” अवघ्या महाराष्ट्राचे श्रीफळ म्हणजे नारळ !. आमच्या कोकणात तर नारळावाचून पान हालत नाही . उसळी , पालेभाज्या , आमट्या , वरण , मासे , चिकन , मटण , अहो इतकेच काय गोडधोडाच्या पदार्थांत सुद्धा वेगवेगळ्या रूपांत खोबरे वापरले जाते .
…
एका टुमदार बंगल्यात एक रिपोर्टर तरुणी आगंतुकासारखी परवानगी वगैरे न विचारता , डायरेक्ट आत शिरते . किचनमध्ये धडक मारत तिथे उभ्या असलेल्या एका सदाबहार जोडप्याला आश्चर्याने विचारते , ” सर , आम्ही तुम्हाला चक्क बटाटावडा खाताना पाहतोय..” चेहऱ्यावर जमेल तेवढे लाघवी हास्य ठेवून आपल्या महाराष्ट्राचे लाडके म्हाग्रू उत्तरतात ,” माझ्या आवडीचे चमचमीत पदार्थ मी नेहमीच खातो !” पुढे तिचा भोचकपणा , ” तरीही इतका फिटनेस …” ” ए बाई कशाला नजर लावती माझ्या नवऱ्याला “, असा सुप्रिया मॅडमचा लुक .. यावरही सचिनजींनी ,’ कोणी काही म्हटले तरी मैं वडा खाकर ही दम लूंगा ‘, असा आविर्भाव ठेवून , परत निरागस हसून बायकोकडे डोळे मिचकावून एक मिश्किल सिक्सर लगावलाच . ” बायकोचे प्रेम नि बटाटावडा ..”
…
मागच्याच आठवड्यात मी एका फूड ग्रुपवर कुळथाच्या पिठीची ( https://kalimirchbysmita.com/kuilth-pithla-recipe-in-marathi/ ) रेसिपी आणि त्या संदर्भातला माझा ब्लॉग शेअर केला होता . तो वाचून त्या ग्रुपवर मला इतक्या भावनिक कंमेंट्स आल्या की मला हे कळून चुकले की काही गोष्टी काळाच्या चक्रात बिलकुल अडकून नाही राहत . त्या आठवणी सदैव आपल्यासोबत राहतात .
…