
“करंजी ग करंजी , तुझ्या पोटात सुखाचं ग सारण … तुला ग्रहण करताना खाणारा होई आनंदी , परंतु देणाऱ्याच्याही पदरात पडे आनंदाचे दान! म्हणूनच तुझ्या कडांना घालते ग वळणदार मुरड !”
…
Celebrating Passion for Food

“करंजी ग करंजी , तुझ्या पोटात सुखाचं ग सारण … तुला ग्रहण करताना खाणारा होई आनंदी , परंतु देणाऱ्याच्याही पदरात पडे आनंदाचे दान! म्हणूनच तुझ्या कडांना घालते ग वळणदार मुरड !”
…

खाण्यातील चवी आणि मानवी स्वभाव यांचं गूळपीठ कसं जमलंय बघा ! आपण बोलताना सहज बोलूनच जातो की, अगदी गोड स्वभाव हो पोरीचा , किंवा काकू जरा तिखटच आहेत तशा ..जेव्हा पाहावे तेव्हा कडवटच बोलणं यांचं , असं यंव न त्यंव ! स्वभावाप्रमाणेच माणसाच्या चवींच्या सुद्धा प्रायॉरिटीज ठरलेल्या .. एखाद्याला तिखट जाळ सोसेल अशी जिव्हा लाभलेली , दुसऱ्याची बत्तीशी जणू काही बत्त्याशाच्या पाकात बुडालेली इतका गोडखाऊ , कोणी भाजी- वरणापेक्षा पानाच्या डाव्या बाजूच्या चटपटीत चटण्या नी लोणच्याच्या अगदी दात आंबवून मिटक्या मारतोय तर कोणी परफेक्ट चवीच्या दहीवड्यावर अजून वरून काळं मीठ भुरभुरवून खातोय !
…

” जोडगोळी ” – हा शब्द मराठीत तसा एकाच अर्थाने वापरला जातो . ज्या दोघांची जोडी अतूट आहे , ती जोडगोळी ! कित्येकदा हा शब्द कौतुकाने आमच्या आया , लहानपणी पालकसभेत एकमेकांना भेटल्यावर बोलायच्या , ” आमच्या कमलेशची नी तुमच्या स्मितूची अगदी जोडगोळी हो , तुझं माझं जमेना नी तुझ्यावाचून गमेना, ह्यॅ ह्यॅ … !” असे म्हणून त्या आया जरी आपले पुत्र किंवा कन्या रत्नं एकमेकांसोबत गुण्या गोविंदाने मिळूनमिसळून राहतात , अशा गोड गैरसमजात राहत असल्या तरी त्यांची पाठ फिरली , की इकडे कमलेश ने माझ्या डोक्यात खवडा ( हाताच्या पहिल्या दोन बोटांचा आकडा करून बोटांच्या हाडाने डोक्यात टणकन मारणे ) मारून मी कळवळायला नी त्याचा वचपा म्हणून मी कमलेशच्या हाताचा चावा घेऊन तो किंचाळायला एकच गाठ पडायची ! आमच्या आया बिचाऱ्या गोऱ्यामोऱ्या होऊन आमची बखोट धरून एकमेकींचा निरोप घ्यायच्या ! अशाच जोडगोळ्या शाळेत विषयांमध्ये सुद्धा असतात बरं का .. ठाऊकच आहेत आपल्याला ! बीजगणित – भूमिती, भौतिकशास्त्र – जीवशास्त्र विथ रसायनशास्त्र अर्धे-मुर्धे , संस्कृत-इंग्रजी , इतिहास- भूगोल …. बाबाब्बो भूगोल उच्चारतानाच माझ्या पोटात आजसुद्धा त्या पृथ्वीवरील गोलार्धाप्रमाणे गोळे फिरतात .
…

नव्वदच्या दशकाच्या सुरवातीला ,नुकतीच तिशी उलटलेला तरुण पत्नी समवेत , आपल्या काखेत सहा महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला घेऊन, रत्नांग्रीच्या एसटीतून मुंबई सेंट्रलला उतरला! जहाजांचे जनरेटर बनवणाऱ्या कंपनीचे युनिट बंद झाल्याने नोकरी सुटली , तर त्या काळी नशीब आजमावायला मुंबादेवीच्या चरणांहून दुसरे स्थान कोठले हो कोकणी माणसाला ?कोठे राहायचे, काय काम करायचे हा सगळा गुंता एकेक करून, मेहनतीने सोडवत हा तरुण आता मुंबईचा चाकरमानी झाला.
…

मागच्या वर्षीचा ऑक्टोबर – नोव्हेंबरचा महिना असावा .. पाऊस तसा पूर्णपणे उघडलेला , मध्येच कधीतरी नवरात्रात एक शिडकावा करून गेलेला . आम्हा जिममधल्या मैत्रिणींचं नुकतंच नवरात्रात दांडियाला घागरा- चोळी घालून नटण – मुरडण , डाएट थोडंसं बाजूला सारून गोड खाणं, हे अंमळ जरा जास्त झालं होतं . दिवाळीला थोडा अवकाश होता , म्हणून वाढलेले वजनी पौंड राहिलेलया दिवसांत जरा कमी करण्यासाठी आम्ही नियमित जिमच्या वाऱ्या करत होतोच . त्यात ट्रेनरने आम्हा मैत्रिणींच्या त्रिकुटाला , वर्कआउट आणि डाएट शिस्तीत पाळायची तंबी दिली होती !…

माझ्या मनात शैक्षणिक जीवनातल्या आठवणींचं एक सेफ डिपॉझिट आहे . कधीकधी हळूचकन उघडून तो खजिना मी हृदयाशी घट्ट कवटाळून, आसवांनी जरासं त्याला सिंचन करून , दोन क्षण आनंदाचे, समाधानाचे अनुभवते . माझं शेक्षणिक जीवन हे शाळेपुरतं मर्यादित न राहता , आत्ता आत्ता अगदी २०१७ च्या पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत व्यापलं होतं . रोज आयुष्याच्या शाळेत नवनवीन धडे गिरवतोय, ते वेगळंच !
…

कोकणात नारळ झाडावरून उतरवणे , हा अगदी वेळखाऊ कार्यक्रम असतो ! अहो वेळखाऊ म्हणजे …. सगळ्यात पहिल्यांदा झाडावर चढणारा बाबल्या किंवा सुभान्या किंवा संत्या , या महामानवांची अपॉइंटमेंट घ्यावी लागते . कारण पूर्ण गावात ते सगळ्यात बिझी प्रस्थ असतात . त्यांना दोन दिवस आधी सांगितल्यावर . परत दोन दिवसांनी आठवण करून मग ते चौथ्या दिवशी आमच्या आवारातून लोखंडी गेटच्या बाहेर उभे राहून , माझ्या बाबाला हाळी देतात , ” इनोदा ए इनोदा, माडावर चढुक इलय , आत्ताच टैम .. माघारून हडे नाय येऊचा ! ” मग बिचारा माझा बाबा आपले वय विसरून , हातातला चहाचा कप तस्साच खाली ठेवत जोर्रात गेट उघडायला धावतो ….. जाता जाता आईला ,” शारदे , पोहे नी चा टाक , बाबल्या इलंय “, असे म्हणतो ! आईची लगबग सुरु… रवलीत पोहे धुऊन पडतात !
…

गणेशोत्सव हा महाराष्ट्रात जितक्या आनंदात साजरा होतो तितकाच तो, देशाच्या इतर भागांतही धूमधडाक्यात साजरा होतो . कारणही तसेच आहे … सान -थोर , गरीब- श्रीमंत , जाती-धर्म , साम्य- भेद या पलीकडे जाऊन ज्या देवाशी मानवाने आत्यंतिक जवळीक साधली आहे , तोच हा शिव पार्वतीचा सुकुमार पुत्र !
…

कोकणात तांदूळ हे मुख्य पीक आहे हे आपण शाळेत भूगोलाच्या पुस्तकात कितीदा वाचले असेल . म्हणजे विशेष करून जेव्हा कोकण विभागातील पिके कोणती तेव्हा पाचपेक्षा जास्त नावे मी अगदी घडाघडा तोंडी परीक्षेत बोलून दाखवल्याचे स्मरते .
…

कोकण भागात ताज्या भाज्यांसोबतच कडधान्ये व त्यांच्या उसळी , सांबारं अतिशय आवडीने खाल्ले जातात . श्रावणातल्या पंगतीला मोड आलेल्या कडवे वालाचे बिरडे , मूग-मटकीची मिक्स उसळ , पावट्याचे दबदबीत आणि विसरून चालणार नाही अशी वाटाण्यांची मक्तेदारी या उसळीत , सांबारात दिसतेच !
…