
महाराष्ट्रात हिरव्या पालेभाज्यांशिवाय स्वयंपाकाला पूर्णत्व येत नाही . थाळीत एखादी पालेभाजी असणे म्हणजेच चौरस आहाराची संकल्पना पूर्ण होऊ शकते. मळ्यातील कसदार मातीतले क्षार आणि जीवनसत्वांनी युक्त अशा या पालेभाज्या निरनिराळ्या रूपांत शिजवून आहारात समाविष्ट होतात- मग ती ओले खोबरे किंवा शेंगदाण्याचा कूट घालून केलेली भाजी असो, धिरडे किंवा थालीपीठ वा वाफवलेले फुणके असोत!
…








