
काही दिवसांपूर्वी फेसबुक वर एक पोस्ट वाचनात आली आणि बऱ्यापैकी ती सोशल मीडियावर चांगलीच फिरली . एका मानसोपचार तज्ज्ञांनी त्या पोस्ट मध्ये आपल्या सणासुदीचे आयुष्यातील महत्त्व अगदी पटेल अशा सोप्या भाषेत सांगितले होते . आपण जे सण साजरे करतो ते एक रिलॅक्सेशन असून नैराश्याला दूर ठेवण्याचा एक उत्तम मार्ग आहे . सध्या आपल्याला वेळ नाही किंवा कोणी “सनातनी विचारांचे” म्हणून टॅग लावला जाईल की काय या भीतीने आपण सण साजरे करायचे सोडून आलेय . लेखकाच्या मते आणि त्यांच्या या भूमिकेशी मी पूर्ण सहमत आहे , जर सणांमागचे भाव , ते का साजरे होतात याचे उद्देश जाणून घेतले तर ते एक अवडंबर न होता स्ट्रेस बस्टर म्हणून चांगले काम करतात .
…








