
आपल्या भारतीय जेवणात दह्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे . आयुर्वेदात अन्न कोणकोणत्या प्रकारांत खावे याचा उल्लेख आढळतो , जसे की लेह्य , पेय , चोष्य, भोज्य, आणि भक्ष्य यांत दह्याचा वेगेवेगळ्या प्रकाराने समावेश केला जातो . दह्यापासून बनलेल्या चटण्या , रायती , कोशिंबिरी पानाची डावी बाजू दृष्ट लागण्यासारखी सजवतात , तर दह्यापासून बनलेले श्रीखंड, लस्सी , पियुष , मठ्ठा सारखे मधुर पदार्थ आणि पेये जिभेचे चोचले सुद्धा पुरवतात . जेवणात सगळ्यात शेवटी वाढलेला दही भात पोटाच्या आरोग्यासोबत मनाचीही तृप्ती साधून जातो .
…




