वाटाणे शिजवण्यासाठी एका पॅनमध्ये २ कप पाणी उकळत ठेवावे . पाणी उकळले की त्यात अर्धा टीस्पून मीठ घालून भिजवलेले वाटाणे घालावेत . वाटाणे या पाण्यात शिजवून घ्यावेत ( १२ ते १५ मिनिटे )
आता आपण वाटणाची तयारी करूया . एका कढईत सुके खोबरे खरपूस भाजून घ्यायचे आहे . भाजल्यावर खोबरे एका ताटलीत काढून घ्यायचेय .
त्यानंतर त्याच कढईत २ टेबलस्पून तेल गरम करून त्यात आले लसूण घालून चांगले गुलाबी रंगावर येईपर्यंत परतून घ्यायचे आहे .
आता लांब चिरलेला कांदा घालून खरपूस परतून घ्यावा ( ८-१० मिनिटे ) . नंतर कोथिंबीर जराशी तेलात परतून घ्यावी .
आता यात किसलेले ओले खोबरे घालून जरासे २-३ मिनिटे परतून घ्यायचे . खूप ब्राऊन होउ देऊ नये नाहीतर ओल्या खोबऱ्याचा फ्रेशनेस भाजीत येणार नाही .
आता भाजलेले सुके खोबरे घालून नीट एकत्र करावे . गॅस बंद करावा . हे भाजलेले वाटप थंड झाले की पाणी घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावे .
आता कढईत अडीच टेबलस्पून तेल गरम करून घ्यावे . यात कढीपत्ता आणि हिंगाची फोडणी करून घ्यावी . त्यात बारीक चिरलेला कांदा घालून मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावा .
नंतर हळद घालून जरा परतून घ्यावी . आता मालवणी मसाला घालून तो जरासा तेल सुटेपर्यंत परतून घ्यावा . थोडे पाणी घालावे म्हणजे करपणार नाही .
आता वाटलेला मसाला व थोडे पाव कप पाणी घालून मसाला चांगला परतुन घयावा .
१० मिनिटे व्यवस्थित मसाला परतल्यावर बटाट्याच्या फोडी आणि शिजवलेले वाटाणे घालून नीट एकत्र करून घ्यावे . त्यात साधारण दीड कप गरम पाणी घालावे . मध्यम आचेवर एक उकळी आली की गॅस मंद करावा व झाकण घालून उसळ शिजू द्यावी ( ८ ते १० मिनिटे )
बटाटे शिजले की आता टोमॅटो घालावेत. झाकण घालून मंद आचेवर ६ ते ७ मिनिटे शिजवावेत .
आता शेवटी चवीपुरते मीठ घालावे . गॅस बंद करावा . आपली उसळ वाढेपर्यंत झाकून ठेवावी . ही उसळ घडीच्या तेलावरच्या पोळ्या , फुलके , तांदळाची भाकरी , आंबोळी , घावणे तसेच भातासोबत खूप चविष्ट लागते .
Recipe by Kali Mirch - by Smita at https://kalimirchbysmita.com/hirvya-vatanyachi-usal-marathi/